पंतप्रधान कृषी सिंचन योजना 2024
Pradhanmantri Krishi Sichai Yojana :- आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रधानमंत्री कृषी विचार योजना सुरू केली आहे.या योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचनासाठी उपकरणांसाठी अनुदान दिले जाईल. (Farmers of the country will be provided subsidy for equipment for irrigation of their fields.) त्या सर्व योजनांसाठी शेतकऱ्यांना हे अनुदानही दिले जाणार आहे. ज्यामध्ये पाण्याची बचत होईल, श्रम कमी होतील आणि खर्चही योग्य प्रकारे होईल. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती देणार आहोत.
Pradhanmantri Krishi Sichan Yojana 2024
आपणा सर्वांना माहीत आहे की अन्नधान्यासाठी शेती ही सर्वात महत्वाची आहे आणि जेव्हा सिंचन योग्य प्रकारे केले जाईल तेव्हाच शेती सुधारेल. शेतात सिंचनासाठी जास्त पाणी लागते. पिकांना योग्य पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांच्या शेताची नासाडी होते. या PMKSY 2024 अंतर्गत शेतकऱ्यांची ही समस्या सोडवली जाईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी पाणी दिले जाईल.
या योजनेंतर्गत बचत गट, ट्रस्ट, सहकारी संस्था, निगमित कंपन्या, उत्पादक शेतकरी गटांचे सदस्य आणि इतर पात्र संस्थांच्या सदस्यांनाही लाभ दिला जाईल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत ५० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024
राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ठिबक सिंचन सुविधा बसविण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यासाठी सुरु करण्यासाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना शेतात ठिबक सिंचन सुविधा बसविण्यासाठी 55 टक्क्यांपर्यंत आर्थिक अनुदान देण्यात येते.
महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे.
राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा वर्षानुवर्षे व पिढ्यानपिढ्या सुरु असलेला एक पारंपारिक व्यवसाय आहे. परंतु दिवसेंदिवस कमी होत चालणारे पर्जन्यमान यामुळे शेती क्षेत्रावर याचा खूप मोठा परिणाम दिसून आला आहे कारण शेती पिकाच्या सिंचनासाठी सतत पाण्याची आवश्यकता असते आणि चुकीच्या पद्धतीने पिकांना पाणी दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा ऱ्हास होतो व परिणामी काही काळानंतर पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून त्यांच्या पिकांना योग्य प्रकारे पाणी मिळावे तसेच पाण्याची बचत व्हावी व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे घेऊन जाण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करुन जास्तीत जास्त पिकांना सूक्ष्म सिंचन उपलब्ध करुन देवून पाण्याचा मोठ्या प्रमाणात होणारा अपव्यय थांबवून कमी पाण्यावर पिकांची उत्पादन क्षमता वाढविणे व जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणे हा प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेचे नाव ठिबक सिंचन अनुदान योजना 2024
लाभार्थी राज्यातील शेतकरी
लाभ सिंचन संच बसविण्यासाठी 55 टक्के अनुदान
उद्देश्य कमी पाण्यात पिकांचे सिंचन करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट
1. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ठिबक सिंचन सुविधा बसविण्यासाठी आर्थिक अनुदान देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
2. शेती क्षेत्रातील कार्य जलद गतीने तसेच फायदेशीर व्हावे.
सिंचनाअभावी शेती पिकांचे होणारे नुकसान कमी करणे.
3. अत्याधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन देणे,
4. पाण्याची अपव्यय टाळणे व पाण्याचा योग्य वापर करणे व पाण्याची कार्यक्षमता वाढवून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळवणे.
5. खात्रीपूर्वक तसेच संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे.
6. शेती क्षेत्राला प्रोत्साहन देणे.
7. शेती क्षेत्राचा औद्योगिक विकास करणे.
8. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे
9. राज्यात कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे. [प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र]
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मराठी चे वैशिष्ट्य
1.राज्य शासनाच्या कृषी विभागाद्वारे सुरु करण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी योजनांपैकी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे.
2.योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदान राशी लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा करण्यात येते.
3.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदान हे केंद्र शासनाकडून व 25 टक्के राज्य शासनाकडून दिले जाते.
4.या योजनेची अंमलबजावणी मुंबई व मुंबई उपनगरे वगळून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजना राबविण्यात येते आहे.
5.या योजनेअंतर्गत जलद व पारदर्शक अंमलबजावणीकरिता कागदपत्रांची संख्या कमी ठेवण्यात आलेली आहे. [प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र]